भारतीयांनो, लवकर इराण सोडा; भारत सरकारचा तातडीचा सल्ला
भारतीयांनो, लवकर इराण सोडा; भारत सरकारचा तातडीचा सल्ला
नवी दिल्ली : इराणमधील वाढत्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांना तातडीने देश सोडण्याचा सल्ला दिला आहे. Ministry of External Affairs (परराष्ट्र मंत्रालय) यांनी अधिकृत निवेदनाद्वारे हा इशारा जारी केला असून, परिस्थिती गंभीर होत असल्याचे नमूद केले आहे.
मंत्रालयाने सांगितले की, इराणमध्ये सुरक्षा स्थिती अनिश्चित बनली असून संभाव्य लष्करी हालचाली, हवाई हल्ले किंवा अंतर्गत अस्थिरतेचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व भारतीयांनी उपलब्ध व्यावसायिक उड्डाणांचा वापर करून शक्य तितक्या लवकर इराण सोडावे. तसेच जे नागरिक तत्काळ निघू शकत नाहीत त्यांनी सुरक्षित स्थळी राहून दूतावासाशी सातत्याने संपर्क ठेवावा.
Embassy ऑफ इंडिया , तेहरण यांनीही हेल्पलाईन क्रमांक आणि ई-मेलद्वारे मदत उपलब्ध करून दिली आहे. आपत्कालीन परिस्थितीत पासपोर्ट, व्हिसा आणि इतर कागदपत्रे तयार ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आणि अनावश्यक प्रवास टाळणे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, भारत सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून गरज भासल्यास विशेष बचाव मोहिम राबविण्याची तयारी दर्शवली आहे. इराणमधील भारतीय नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





